Atma yojana Maharashtra कृषि विभाग आत्मा योजना महाराष्ट्र

Atma yojana Maharashtra कृषि विभाग आत्मा योजना महाराष्ट्र

 





What is Atma yojana Maharashtra विषयी मित्रांनो आज आपण जाऊन घेणार आहोत. शेतकरी गट योजना काय आहे तसेच आत्मा योजना काय आहे. आत्मा अंतर्गत शेतकरी गट नोंदणी कशी करावी. महाराष्ट्र कृषि विभाग अंतर्गत आत्मा योजना शेतकऱ्यांसाठी कशी फायदेशीर ठरू शकते तर ह्या सर्व मुद्द्यावर या ठिकाणी आपण प्रकाश टाकणार आहोत.

खेडेगावातील शेतकरी बांधवाना शेतकरी योजना संदर्भात माहिती नसते. शेतकरी योजना विषयी माहिती असो किंवा शेतकरी अनुदान विषयी माहिती असो किंवा इतर शेती संदर्भातील योजनेची माहिती असो या संदर्भातील व्हिडीओ मार्गदर्शनासाठी digital dg या युट्युब चॅनलला भेट देऊन शेती आणि शेती विषयक शासकीय योजना संदर्भातील अगदी इतन्भूत माहिती या ठिकाणी व्हिडीओद्वारे दिली जाते. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या विविध शेतकरी योजनेचा लाभ कसा घ्यावा हे समजणे तुम्हाला सोपे जाईल.

आत्मा योजना काय आहे  Atma yojana Maharashtra

शेतकरी गट योजनेविषयी जाणून घेण्य अगोदर आपण आत्मा योजना काय आहे  जाणून घेणार आहोत. Agricultural Technology Management Agency  म्हणजेच ATMA. आत्मा हि योजना २००५ ते २००६ या वर्षी सुरु करण्यात आली. शेतकरी समूह, संस्था (NGO ) कृषी विज्ञान केंद्र इत्यादी आत्मा योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात. शेतकरी गट केल्यास शेतकऱ्यांना अनेक योजनांचा लाभ मिळू शकतो.

Atma yojana Maharashtra राबविण्यासाठी एकीचे बळ महत्वाचे

मित्रांनो लहानपणी शालेय शिक्षणाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये एकीचे बळ हि  गोष्ठ आपल्याला शिकविण्यात आली होती. एक कडी मुलाला तोडण्यास सांगण्यात येते तो मुलगा ती कडी अगदी सहजपणे तोडतो. मग तशाच दहा काड्यांचा समूह करून त्याच मुलाला पुन्हा तोडण्यास सांगण्यात येते.

पण या वेळेस मात्र तो मुलगा त्या कड्या तोडू शकत नाही या उदाहरणातून एकीचे बळ हि संकल्पना स्पष्ठ होते. तुम्हाला कदाचित ती गोष्ठ आठवत असेल या गोष्टीचा या ठिकाणी संदर्भ देण्याचे कारण म्हणजेच एकीचे बळ हि संकल्पना कोणत्याही क्षेत्रात लागू होते. बँकिंग क्षेत्र असो. कॉर्पोरेट क्षेत्र असो, ट्रान्सपोर्ट क्षेत्र असो कि मग आपले शेतीक्षेत्र असो एकीचे बळ हि संकल्पना या ठिकाणी मोठ्या प्रभावीपणे काम करते.

Atma yojana Maharashtra योजनेचा लाभ घ्या.

आज बरेच क्षेत्र हे संघटीत आहेत परंतु शेतकरी अजूनही संघटीत नाही. उदाहरणच द्यावयाचे झाल्यास बँकेतील कर्मचार्यांना पगार वाढ पाहिजे असली के ते संप करतात मग त्यांना पगार वाढ दिली जाते.

शेतकऱ्यांचा कांदा थोडा जर महाग झालं तर पांढरपेशी लोक लगेच संघटीत होऊन यावर आवाज उठवितात, करण्खाण्यातील कामगारांना दिवाळी बोनस वेळेवर नाही मिळाला तर ते लगेच संप करतात सांगण्याचे तात्पर्य एवढेच आहे कि तुमचा समूह असेल किंवा संघटना असेल तर कोणतेही इत्सिप्त साध्य करणे सोपे जाते.
महाराष्ट्रातील सर्व शेतकरी गटांची माहिती एका क्लिकवर

तुम्हाला जर तुमच्या जिल्ह्यामध्ये किंवा तुमच्या तालुक्यमध्ये कोणकोणते आत्मा अंतर्गत कोणकोणते शेतकरी गट निर्माण झाले आहेत हे जाणून घ्यावयाचे असेल तर खालील लिंकवर क्लिक करा.

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वेबसाईटची लिंक या ठिकाणी दिलेली आहे या लिंकवर क्लिक करताच तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वेबसाईटवर जाल.

या ठिकाणी तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर त्यासमोरील pdf file आयकॉनवर क्लिक करा आणि एका क्लिकवर  तुमच्या जिल्ह्यातील आत्मा अंतर्गत जितके हि शेतकरी गट निर्माण झाले असतील त्या सर्व शेतकरी गटांच्या अध्यक्ष व सचिव यांचे मोबाईल नंबर तुम्हाला दिसेल त्याच प्रमाणे त्यांनी कोणत्या उद्देशाने गट निर्माण केला, त्यांच्या गटाचे नाव इत्यादी संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळेल.

गाव व गाव परिसरातील शेतकरी, शेतकरी गट किंवा शेतकरी कंपनी निर्माण करू शकतात.

 Atma shetkari gat आत्मा शेतकरी गट

एका शेतकरी गटामध्ये कमीत कमी १५ शेतकरी एकत्रित आल्यास ते आत्मा योजनेंतर्गत शेतकरी गट म्हणून नोंदणी करू शकतात. शेतकरी गट नोंदणी केल्यास आणि ‘आत्मा’ च्या नियमाप्रमाणे चालविल्यास अशा शेतकरी गटांना अनेक योजनांचा लाभ घेता येतो.

शेतकरी गट स्थापन करण्यासाठी शेतकऱ्यांना अगोदर एकत्रित येणे गरजेचे आहे. शेतकरी कोणकोणती पिके घेतात त्यावर आधारित त्यांना शेतकरी गट तयार करता येतो यासाठी गावातील किंवा गाव परिसरातील शेतकरी एकत्र येवून शेतकरी गट निर्माण करू शकतात.

अनेक शेतकरी गट मिळून शेतकरी कंपनी निर्माण करू शकतात. अशा यशस्वीपणे नोंदणी झालेल्या सक्रीय गटास किंवा शेतकरी कंपनीस अनेक शासकीय योजनांचा लाभ घेता येतो.

आत्मा अंतर्गत शेतकरी गट नोंदणी प्रक्रिया.

तालुक्याच्या ठिकाणी आत्मा या योजनेसंदर्भात संबधित अधिकारी साहेबांकडून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. वेगवेगळ्या पिक निहाय किंवा कृषी उत्पादन निहाय शेतकरी गट स्थापन केल्यानंतर शेतकऱ्यांना शेतकरी गट नोंदणीसाठी विहित नमुन्यात कृषी विभागाच्या आत्मा योजनेच्या अधिकारी साहेबांकडे शेतकरी गट नोंदणीचा अर्ज सादर करावा लागतो.

शेतकरी गट नोंदणीचा फॉर्म तालुक्याच्या संबधित कार्यालयात तुम्हाला मिळेल किंवा झेरॉक्स सेंटरवर देखील मिळू शकतो किंवा तुम्ही खालील लिंकवर क्लिक करून देखील शेतकरी गट नोंदणीचा ओरिजिनल फॉर्म तुमच्या मोबाईलवर किंवा तुमच्या कॉम्प्युटरवर डाउनलोड करू शकता.
आत्मा अंतर्गत शेतकरी गट नोंदणीकेल्यानंतर शेतकरी गटाने त्यांच्या ठरलेल्या धेण्यानुसार चांगले कार्य करणे अपेक्षित आहे आणि शेतकरी गाटासंदार्भातील नियम पाळणे आवश्यक आहे.

शेतकरी गट स्थापन झाल्यानंतर  गटाची नियमित बैठक घेतली जावी, शेतकरी गटांनी सर्व अभिलेखे, वेगवेगळ्या  नोंद वह्या, रजिस्टर तसेच गटाचे इतर रेकॉर्ड ठेवणे आवश्यक आहे जसे कि शेतकरी गटाच्या बैठकांचे इतिवृत्त, बँक पासबूक रकमांचा हिशेब इत्यादी.

शेतकरी गटासाठी काही मार्गदर्शक सूचना व माहितीची pdf फाईल खालील लिंकवर क्लिक करून डाउनलोड करून घ्या आणि सविस्तर वाचून घ्या.


शेतकरी गट मार्गदर्शक सूचना

आत्मा शेतकरी गट नोंदणी फाॅर्म

PDF चा पासवर्ड 8010 आहे.




आत्मा शेती योजना महाराष्ट्र Atma agriculture scheme Maharashtra

मित्रांनो आता आपण जाणून घेवूयात कि कृषि विभाग आत्मा अंतर्गत कोणकोणत्या योजना महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांना मिळू शकतात.  कृषी विभाग योजना महाराष्ट्र अंतर्गत आत्मा शेतकरी गटांना कौशल्य विकासासाठी ५००० प्रती शेतकरी गट यांना अर्थसहाय्य केले जाते.

तसेच सक्षम शेतकरी गटास बीजभांडवल फिरता निधी यासाठी १०,००० रुपये प्रती शेतकरी गट अर्थ सहाय्य केले जाते. याव्यतिरिक्त आत्मा अंतर्गत महिलांचे अन्नसुरक्षा गटास पशुसंवर्धन, शेळीपालन, कुक्कुट पालन, परसबाग इत्यादी व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रशिक्षण प्रकाशने व निविष्ठा खरेदी करण्यासाठी सुद्धा १०,००० बीज भांडवल देण्यात येते.

शिवाय शेतकरी गटासाठी अभ्यास दौरे सुद्धा आयोजित केले जातात यामध्ये विविध भागातील पिक पद्धती बघून तुमच्या पिक पद्धतीमध्ये बदल करू शकता.

आत्मा अंतर्गत निर्माण झालेल्या शेतकरी गटाने जर चांगल्या पद्धतीने संघटीत राहून कार्य केले तर अशा उतृष्ट कार्य करणाऱ्या गटास २०,००० रुपये पारितोषिक स्वरुपात दिले जाते.