शेतकऱ्यांसाठी खुश खबर अतिवृष्टी नुकसान भरपाई 15 हजार थेट बँक खात्यात

शेतकऱ्यांसाठी खुश खबर अतिवृष्टी नुकसान भरपाई 15 हजार थेट बँक खात्यात

 





महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई १५ हजार मिळणार असल्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शेतकरी बांधवांना दिलासा मिळाला आहे. जाणून घेवूयात या संबधी अधिक सविस्तर माहिती.

अतिवृष्टीप्रमाणेच सततच्या पावसामुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येईल़  तसेच आपत्तीकाळात बाधितांना देण्यात येणारी तातडीची मदत  पाच हजारांवरून १५ हजार रुपये करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधानसभेत केली.

राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह अन्य सदस्यांनी केली होती़  या चर्चेवरील उत्तरात शिंदे यांनी या नव्या घोषणा केल्या़  आजवर अतिवृष्टीमुळे (६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस झाल्यास) नुकसान झाल्यास भरपाई देण्यात येत होती. मात्र, आता सततच्या पावसामुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले असल्यास त्याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले.

गेल्या काही दिवसांतील अतिवृष्टी, सततचा पाऊस, पूर यामुळे १८ लाख २१ हजार हेक्टर जमीन बाधित झाली आहे. यामध्ये जिरायतीखालील १७ लाख ५९ हजार, बागायतीखालील २५ हजार, फळपीक ३६ हजार हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. आतापर्यंत पूरबाधित २१ हजार व्यक्तींना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यांत आल्याची माहिती शिंदे यांनी दिली.

नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधितांना त्वरित मदत मिळावी, यासाठी यापुढे पंचनाम्यासाठी मोबाईल अ‍ॅपचा वापर करण्यात येईल. लवकरच मोबाईलद्वारे ई-पंचनामा करणे, त्यासाठी आवश्यक निधीची मागणी करणे आणि संबंधितांच्या आधारशी जोडलेल्या बँक खात्यात थेट पैसे जमा करणे, अशी प्रणाली नव्याने विकसित करण्यात येत आहे. यामध्ये रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा (सॅटेलाइट इमेज) वापर करण्यात येणार आहे. तसेच ड्रोन तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. गोगलगायी, यलो मोझ्ॉक यासारख्या कीड रोगाचा प्रादुर्भाव होऊन नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना मदत दिली जाईल. नियमित कर्जफेड केलेल्या शेतकऱ्यांना ५० हजारांच्या मर्यादेत प्रोत्साहन अनुदान वाटप सप्टेंबर महिन्यात सुरू केले जाईल, असेही शिंदे यांनी जाहीर केले.

शेतकऱ्यांना दिली जाणारी १५ हजार रुपये नुकसानभरपाई आर्थिक मदत प्रती हेक्टरी वाढीव मदत असून यापूर्वी २ हेक्टर मर्यादेत मदत केली जात होती.

मात्र आता हीच मदत 3 हेक्टर क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना देखील दिली जाणार आहे. म्हणजेच शासनाचे हेक्टर मर्यादा वाढवून दिलेली आहे.

आपत्तीमध्ये तत्काळ देण्यात येणारी मदत ही पाच हजार रूपयांवरून १५ हजार रूपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे शेतकरी बांधवांसाठी हि नक्कीच दिलासादायक बाब ठरणार आहे.

कोणताही शेतकरी अतिवृष्टीग्रस्त मदतीपासून वंचित राहणार नाही त्याचप्रमाणे हि  मदत वाटप करतांना कोणत्याही शेतकऱ्यांची तक्रार येवू नाय अशा सूचनाही जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

शेती करत असतांना शेतकरी बांधवाना विविध संकटाचा सामना करावा लगतो. त्यामध्ये महागाई असेल किंवा अजून इतर बाबी. शेतकऱ्यांना शेती करत असतांना सर्वात जास्त आर्थिक फटका बसतो तो नैसर्गिक संकटामुळे.

यासाठी शेतकरी बांधव आपल्या पिकांचा पिक विमा देखील काढत असतो. परतू शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये योग्य वेळी नुकसानभरपाईचे पैसे जमा न झाल्याने त्यांची तारांबळ उडते.

अशावेळी महाराष्ट्र सरकारने नुकसान भरपाई १५ हजार देण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याप्रमाणे लवकरात लवकर हा निधी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणे गरजेचे आहे.